
स्वातंत्र्य दिन
शहीदांनी साजरा केला होता...
ब्रिटीश राजवटीतून आता हिंदुस्तान एक स्वतंत्र राष्ट्र होणार म्हणून ...
जगाच्या नकाश्यावर आता भारत छापून येणार म्हणून...
स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार म्हणून ...
प्रत्येक वेळी तिरंगा अभिमानानं सलाम घेणार म्हणून...
आम्ही आमचा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय....
रविवारी १५ ऑगस्ट येतोय म्हणून एक सुट्टी गेली याचा खेद व्यक्त करत,
जमतील तितकी टाळकी गोळा करून मागच्या वर्षी साजरा केला म्हणून या वर्षी सुद्धा... रडत रडत,
तिरंगी रंगाचे कपडे घालून मी कसा किंवा कशी दिसतेय या आनंदात जगत,
आणि रोजच्या सिरीयल मधून रिमोट ने अधून मधून न्यूज वरच्या परेड बघत...
मग आता मी काय करू त्याला.... ?
असा प्रश्न निर्माण झाला असेल तर बरंच काही आहे करण्यासारखं...
या स्वातंत्र्य दिनी एक स्वप्नं बघून पुढच्या वर्षापर्यंत पूर्ण करण्यासारखं
नॉट नेसेसरी .... आपण लढायला जायला हवं...
पण आपल्या कडे जे आहे त्यातलं थोडं गरिबाला द्यायला हवं
शिक्षण पासून जे वंचित आहेत त्यांना जगण्यापुरतं शिकवायला हवं
आपल्या मुलाने सुद्धा जवान होण्याचा स्वप्न पाहायला हवं
हा अगदीच तितकी ताकद नसेल
तर इंजिनियरिंग करून भारतात राहायला हवं
तेव्हा नुसतंच “ भारत माता कि जय !” म्हणण्यापेक्षा
आज देशाला गरज आहे
तुमच्या मनातल्या आवाजाची...
एक नवी क्रांती घडवण्याच्या
काही नव्या रिवाजांची...
चला काहीतरी चांगल मनाशी ठरवू
आणि आपल्या देशाला जे खरच हवंय ते... जमेल तितकं पुरवू
.
स्वातंत्र्य दिन चिरायू होवो.....
कवी किरण
No comments:
Post a Comment