
आयुष्यात खूप माणसं येतात
काही तिखट काही गोड असतात
पण त्यातली तुझ्यासारखी मोजकीच....
लोणच्याची फोड असतात








याला काय अर्थ आहे?

मनासारखं जगला नाहीत, तर सारं जीवन व्यर्थ आहे,
जगायचं म्हणून जगायचं ! याला काय अर्थ आहे?
कुणाला तरी आवडेल म्हणून, नाटक करत बसायचं
मनात जरी द्वेष असला, तरी खोटं हसायचं..
उठतोय, झोपतोय, खातोय, पितोय.. काहींना यातच परमार्थ आहे
जगायचं म्हणून जगायचं ! याला काय अर्थ आहे?
पैसा इज्जत शोहरत, सारं सारं निघून जाईल
जे करायचं राहिलं होतं, त्यात जीव अडकून राहील
देव पूजेमध्येसुद्धा, उरला फक्त स्वार्थ आहे
जगायचं म्हणून जगायचं ! याला काय अर्थ आहे?
आम्ही नाही आत्महत्या, आणि खून करणारे
आम्ही तर आहोत मनाच्या, सौंदर्यावर मरणारे
आत्मा चिरंतन आहे, शरीर थोड्या वेळा पुरतं आहे
जगायचं म्हणून जगायचं ! याला काय अर्थ आहे?
खूप कलाकार वेळ नाही, म्हणून रिकामी बसले आहेत
आयुष्याच्या रंगमंचावर, रोजच्या कामात घुसले आहेत
त्याला सुख कसं म्हणावं, जे तात्पुरतं आहे
जगायचं म्हणून जगायचं ! याला काय अर्थ आहे?
म्हणून जगा आवडेल तसं, कुणाचं नुकसान न करता,
आयुष्याला व्यसनांच्या, डोहामध्ये न भरता
स्वतःवरती प्रेम केलंत तर, तुमचा जन्म सार्थ आहे
कारण... जगायचं म्हणून जगायचं ! याला काय अर्थ आहे?
कवी किरण

धोका
मी तुझ्यावर प्रेम केलं ,
तू नुसती मैत्री
मी ठेवला विश्वास
तू केलीस ती खात्री
मी सारखा चालत राहिलो
तू मात्र मध्येच थांबलीस
जखम म्हणून मी लावलं मनाला
तू मिठासारखी झोम्ब्लीस
आवरत होतो स्वतःला
तेव्हा पुन्हा जवळ आलीस
पुन्हा स्वप्नात एकट सोडून,
चक्क.... निघून गेलीस
तुझं नाव फोन बुक च्या,
लिस्ट मध्ये बोल्ड केलं
कुणाचा तरी फोन येतोय
सांगून तू मात्र होल्ड केलं
तोच कुणाचातरी आज
तुझ्या जगाचा राजा झालाय
मी इथे उभा एकटा
तिथे लग्नाचा गाजावाजा झालाय
मनात रिकामी घुसमट चाललीय
थांबलाय आता झोका
शपथ मोडून जो दिलास
हाच तो ग का धोका ?
....कवी किरण

तिच्यात भिजलेला पाऊस....
माझ्या इतकाच तोही, तिच्या प्रेमात भिजला होता
त्या दिवशी तिला पाहून, चक्क पाऊस लाजला होता
कधीच न भेटल्यासारखा ,कोसळत होता बरसत होता
आढी वेढी वळणं घेऊन, बिलगण्यासाठी तरसत होता
त्यानं मिठीत घेताच.. काळजाचा ठोका वाजला होता
त्या दिवशी तिला पाहून, चक्क पाऊस लाजला होता
कधी रिमझिम, कधी मुसळधार, श्रावणधारा पडत होत्या
इतक्या दिवसांचे उसासे, आसमंतात सोडत होत्या
कस्तुरीचा मादक गंध, तनामनात रुजला होता
त्या दिवशी तिला पाहून, चक्क पाऊस लाजला होता
ऋतू येतात ऋतू जातात, तिचं सौंदर्य अबाधित असतं
बदलत्या ऋतूप्रमाणे, ते बदलत्या रंगात दिसत
अप्सरेच्या येण्यानं जसा, इंद्र दरबार थजला होता
त्या दिवशी तिला पाहून, चक्क पाऊस लाजला होता
खूप दिवसा नंतर तिला, असे भिजावेसे वाटले होते
ओलेचिंब करण्याकरता, प्रीतीचे मेघ दाटले होते
खूप बरसल्यावर मांडीवरती, डोकं ठेवून निजला होता
त्या दिवशी तिला पाहून, चक्क पाऊस लाजला होता
कवी किरण