कवितेतल्या शब्दातही जे राहिले सांगायचे
आज या गझलेतुनी ते सूर सारे गायचे
तो चंद्रमा नभातला मज, सारखा बघायचा
मग चादरीच्या चांदण्या तो सारखा पुसायचा
इच्छा मनीची मागता पण कोणीना तुटायचे
आज या गझलेतुनी ते सूर सारे गायचे
मजपाशी होते क्षण तुला एकांती ग भेटायचे
देहास होत्या भावना पण ‘ते’ मनी ना यायचे
पावित्र्य जे स्पर्शातले होते मला राखायचे
आज या गझलेतुनी ते सूर सारे गायचे
लग्नातला चेहरा तुझा अस्मानीच्या परीसारखा
मी सुद्धा होतो सवे पण एकला नि पोरका
झाली होती तू वधू पण राहिलो मी वर व्हायचे
आज या गझलेतुनी ते सूर सारे गायचे
कवी किरण
Kya baat hai :'(
ReplyDelete