...तिचं आणि माझं...' जग दोघांचं '....
या माझ्या काव्यसंग्रहातील..
लवकरच प्रकाशनाच्या वाटेवर असणाऱ्या माझ्या काही निवडक कविता ...

Saturday, August 7, 2010

किती वेळ


तू तिथे आणि मी इथे..
असं कसं बरं चालायचं
किती वेळ आपण हे असं,
इतक्या दुरून बोलायचं

खूप झाला विरह आणि
खूप झालं काम
भेटली नाहीस तर घ्यावं लागेल,
कायमचं हरीनाम
किती दिवस किनाऱ्यावर,
असं एकट्याने चालायचं
किती वेळ आपण हे असं,
इतक्या दुरून बोलायचं

करियर पैसा बंगला गाडी,
सगळं सगळं विकत मिळतं
आपलं कुणी हक्काचं हवं,
हे बहुतेकांना उशिराच कळतं
असं काळ वेळ ठरवून बोलणं,
आपल्यात नाही बुवा चालायचं
किती वेळ आपण हे असं,
इतक्या दुरून बोलायचं

ठावूक आहे नुसत्या प्रेमाने,
सारे प्रश्न सुटणार नाही
पण प्रेम मोज्क्यांच्याच नशिबात असतं,
ते सारखं सारखं भेटणार नाही
वाटतं दूर हिंदोळ्यावर,
फक्त दोघांनीच झुलायचं
किती वेळ आपण हे असं,
इतक्या दुरून बोलायचं

खूपच उशीर केलायस राणी,
म्हणून सांगतो थेट तुला
गुपचूप जशी भेटायचीस,
तशी हळूच येऊन खेट मला
मनाची समजूत घालून थकलो..
कि प्रेमात हे असं चालायचंच
किती वेळ आपण हे असं,
इतक्या दुरून बोलायचं

No comments:

Post a Comment